माहुली गड ( mahuli Fort )आसनगाव मुंबई

माहुली किल्ला


माहुली किल्ला  Mahuli Fort –
हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपासमजला जातो.ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावा जवळ एक दुर्ग त्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणिपळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे.मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाणकोणाही निसर्गप्रेमी माणसालाआपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेकसुळके असलेला लांबलचक असा हा डोंगरमाहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचेदोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत.उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणिदक्षिणेचा भंडारगड.इतिहास : इतर अनेक किल्ल्यांप्रमाणेयाही किल्ल्याची मूळ उभारणी कोणीकेलीम हे ज्ञात नाही. पण १४८५ च्यासुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीच्या संस्थापक असलेल्या मलिकअहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजेनिजामशाहीचे संचालक बनल्यावरदिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाहीसेना संयुक्तपणे निजामशाहीबुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या.

१६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीणपरिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणूनजुन्नर- शिवनेरीहून जिजाबाई व बाळशिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला.खानजमान आहे म्हणजे महाबतखानाच्यामुलाने माहुलीला वेढा दिला.शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदतमागितली. पण त्यांनी नकार दिलाअसता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे१६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनीहा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण१६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावालागला. लगेसच तो परत जिंकून घेतला गेला.१६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुटपरत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचामनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगारसरदार माहुलीवर कारभार पाहू लागला.त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले.

फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्दशिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखालीमाहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला.दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बलहजार मावळे मोगलांनी कापून काढले.मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. यायशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारीसोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेगहा किल्लेदार रुजू झाल. नंतर १६ जून १६७०रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर दोनशेमोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंतपिंगळ्यांनी माहुली. पळसगड व भंडारगडाहे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

आसनगावमार्गे माहुली गावातूनशिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावरसमोरच पाण्याची दोन टाकी आहेत. पाचमिनिटांवर आणखी एक पाण्याचे टाके आहे.उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्यादेवड्या आहेत. समोरच ढासळलेल्याअवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसाराशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांगदिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा,दक्षिणेपूर्वेला माथेरान रांग,दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे. तुंगारेश्वररांग असलेला प्रचंड मुलुख दिसतो.शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावरडावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतचछप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. 
पुढेवाड्याचे काही अवशेष आढळतात. 
समोरचपाण्याचा फार मोठा तलाव आहे.
 पुढेगेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाटखिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजेमाहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंडआहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्याबाजूस अ५०० ते ६०० फुट खाली उतरल्यावरकड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. यादरवाज्यातून गडावर यायचे झाल्यासप्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतूनवाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमहीपाण्याचे भुयारी टाके आहे. येथून पुढेजाणारी वाट गडाच्या दक्षिणटोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊनजाते. 
भंडारगडावरून समोरच उभे असणारेभटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात.समोरच उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवरवजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्यापरिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते.गडावर जाण्याच्या वाटा :
१. आसनगाव मार्गे : 
मुंबई-नाशिक लोहमार्गा वरील आसनगाव गाठावे. इथून ५कि.मी. 
अंतरावरील गडाच्यापायथ्याशी असणाऱ्या माहुली या गावीपायी अथवा रिक्षाने जाता येते.गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदरमंदिर आहे. रात्रीतेथे राहण्याची सोयहोते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३कि.मी. 
चा खडा चढ चढून जावे. वाटेत एकलोखंडी शिडी आहे. ती पार करून वरगेल्यावर समोरच पाण्यची दोन टाकीदिस्तात. या वाटेने गडावर जाण्यास २तास लागतात.२. वाशिंदमार्गे : लोकलने किंवा एस.टी. नेवाशिंदला उतरावे.
 उत्तरेला दहागावआणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा.चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्यादक्षिण टोकापासून निघालेल्या वपश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे.सोंडेवरून नवरा-नवरी सुळके उजवीकडे ठेवत.अवघड श्रेणीचा कातळटप्पा चढून कल्याणदरवाजाने भंडारगडावर प्रवेश करावा.कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो.
ही वाटा खूप अवघड असल्यानेप्रस्तरारोहणाचे साहित्य जवळ असणेआवश्यक आहे.

भंडारगडावर रहाण्याची कोणतीही सोयनाही. किल्ले माहुलीवर रहाण्यासाठीपहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत, पण शक्यतो.हा ट्रेक एक दिवसाचाच करावा.किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावीलागते.किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्यादेवड्यासमोर पाण्याचे टाके आहे. येथीलपाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोयनाही. 
त्यामुळे तेथे असताना पाण्याचासाठा जवळ ठेवावा. किल्ल्यावरजाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन तासकल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तासलागतात.सूचना : वाट आसनगाव मार्गे सोपीकल्याण दरवाजा मार्गे अवघड.

Comments

Popular Posts